दोडातील इंटरनेट सेवा आणखी तीन दिवस बंद   

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील बदरवाह येथील मोबाईल  इंटरनेट सेवा तीन दिवस बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इंटरनेट सेवेचा गैरवापर होता कामा नये, यासाठी निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले. 
 
देश विरोधी शक्तींकडून इंटरनेटचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवन विस्कळीत होण्याची भीती असल्याने सेवा बंद केली आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. एकूण ३७ मनोर्‍यांतून सेवा बंद केली. त्यात १९ रिलायन्स जिओ आणि १९ एअरटेलचे आहेत. जम्मू विभागाचे पोलिस अधिकारी भीमसेन तुती यांनी सेवा बंद करावी, अशी शिफारस केली होती. मुख्य गृहसचिव चंद्रकेर भारती यांनी सांगितले की, २७ मे सायंकाळी ८ वाजेपर्यंत सेवा बंद करण्याचा आदेश दिला आहे.  

Related Articles